बुधवार, १८ मार्च, २००९

मराठी ब्लॉग विश्व






भाव असाच समजुदे, स्पर्शाला स्पर्शाचा!!!

किती पटकन म्हणतोस तू
मला तुला मिठीत घ्यायचंय


अश्या ठिकाणी भेटायचंय...
कोवळ्या रानफुलांच्या जागी
हळुवारपणे स्पर्शायचंय
अन कशा कशाचं बंधन न पाळता
तुला घट्ट कवेत घेउन बसायचंय...
किती अवघड जातं मला
जेव्हा ह्या प्रश्नाला उत्तर मागतोस
माझ्या सगळ्या म्हणण्यावर
तुला काय वाटतं? असं विचारतोस...
कसं सांगायचं तुला
काय येतं माझ्या मनात!!
सांगण्याचा प्रयत्न केला तरी
लाज येते आडवी शब्दात...
मनामधलं सगळं काही
ओठांवर येउन अडून राहतं
पण तुझ्या स्पर्शाचं फुल मात्र
क्षणोक्षणी खुलत असतं...
कल्पनाही एवढी सुंदर असते
अश्या क्षणांना जाणवतं
तुझ्या जवळ असण्याचं
अजून एक स्वप्न जागं होतं...
माझ्या सगळ्या स्वप्नांचं
सगळं श्रेय तुला
अंतरीचा प्रत्येक भाव
फक्त तुझ्या असण्याचा
माझा प्रत्येक श्वास
फक्त तुझ्या प्रेमाचा
अन आयुष्याचा प्रत्येक क्षण
फक्त तुझ्या हक्काचा...
सगळं सांगायला कशाला रे
आधार हवा शब्दांचा?
जपू दे जरा हळुवारपणा
या क्षणाला क्षणांचा
काहीच बोलू नकोस
फक्त जवळ राहा
भाव असाच समजुदे
स्पर्शाला स्पर्शाचा!!!

फ़क्त एकदा "हो" म्हण

मला खूप आवडतं जेव्हा तु मला तुझी म्हणतोस...
मी तुझ्यात हरवुन गेलोय
कायमची माझी बन सांगतोस...
इतक्या लवकर कसे हरवलो
मला खरच कळेनासं झालय...
तुझ्या माझ्या नात्याचं
गणितच वेगळं बनलय
असं मी म्हंटलं की मात्र
तुझं उत्तर लगेच तयार
प्रेमाचं गणितच नसतं
असतं बिनवेळेचं घड्याळ
त्या घड्याळाला काटेच नसतात
नसतं स्वत:चही बंधन
तिथेच फ़ुलतं तुझ्या माझ्या
स्वप्नांचं आंगण...
त्या आंगणातली सगळी स्वप्नं
तुझ्या असण्याने पूर्ण होतील
तुझ्या माझ्या नात्यांच्या
रेशिमगाठी जुळतील...
म्हणून विनवतो तुला
तू लवकर माझी बन
माहीत आहे माझीच आहेस
फ़क्त एकदा "हो" म्हण

कळल्याशिवाय राहणार नाही...

लाख विनवण्या केल्या तरी
माझं प्रेम नाही तुला उमजत
आसवांची किम्मत खरच
गळल्यशिवाय नाही कळत

सुरुवातीला वाटत होतं
तुला समजतील माझे भाव
नजरेतुनच घेशिल तु
माझ्या मुक्या शब्दांचा ठाव
तुझ्या माझ्यातलं अंतर मग
अगदीच शुल्लक ठरेल
मनामधे तुझ्या
प्रेमाची एक ज्योत तेवेल
प्रेम तुझं दिसलं मला
भावही कळले मला
अन क्शणा क्शणाला बदलणारे
तुझे वेडही उमगले मला

कशाला आता शब्दांचे खेळ मग
कशाला आता वेडी आस
पुर्ततेआधिच अपुरे राहिले
तुझ्यात गुन्तलेले माझे श्वास
तरीही मी आशा सोडली नाही
आस मनीची सुटली नाही
तुझ्या शब्दांना झेलनारी
ओंजळ माझी तुटली नाही

आज त्यात जमा आहेत
माझे वेडे अश्रु
तेही आटुन जातील
संपतील वाट पाहुन
पण थांबणार नाही क्शणभरही
माझ्या मनातलं काहूर
सुटतील बांध...
तुटतील श्वास ...
पण तुझी वाट पाहील
माझी वेडी आस....

लक्शात ठेव शब्द माझे
स्मरतील तुला एकांतपणी
लढशील कसाही
सावरशीलही....
पण एक अश्रु तुझ्या डोळ्यातुन
गळल्याशिवाय राहणार नाही
माझ्या प्रेमाची किंमत तुला
कळल्याशिवाय राहणार नाही...

माझ्या प्रेमाची किंमत तुला
कळल्याशिवाय राहणार नाही...

प्रद्न्या

पुर्वी होतं जसं...

आज माझे शब्द संपले आहेत...
मनात वादळ असलं तरी....
तुझ दु:ख किती सलतं मला
सल तुला आणि वेदना माझ्या उरी...

कोणत्या क्शणाची चूक ही...
कि कोणत्या घटनेची परिणति
कोणत्या विचाराने माझ्या सांग
अशी बोच तुला दिली...

कळेनासंच झालय...
हे काय चाललं आहे...
मनात नसुनही असं काही
माझ्याकडुन का होतंय

शंभर प्रश्न उभे समोर,
पण कशाचंच उत्तर मिळत नाही...
मनात येत असुनही मला
प्रायश्च्चित्त काही करता येत नाही...

काय करु?
तुच सांग आता
तुलाही कसं सांगायचं
उमजेना मला...

सारं काही मान्य आहे...
तुझा रोश सोडुन..
तु परत तसाच हवास...
सगळा राग विसरुन...

खरंच सांगते तुला
पुन्हा असं नाही होवु देणार...
मनातल्या विचारांचा गोंधळ
शब्दात नाही होवु देणार...

जमत असेल तर एकदा
पुन्हा विश्वास ठेवुन पहा
तुझ्या समाधानासाठी एखादी
शिक्शा करुन पहा...

सगळं काही मान्य मला
तू म्हणशील तसं...
पण तसच हवं सगळं
पुर्वी होतं जसं...

पुर्वी होतं जसं...
पुर्वी होतं जसं...

शनिवार, २६ एप्रिल, २००८

आमच्यासारख्यांना जगण्यासाठी....

मला जे म्हणायचं होतं ते तितकसं मनासारखं जमलं नाही बहुतेक
पण तरीही तुम्हा सगळ्यांशी शेअर करावसं वाटलं........
--------------------------------
लहान असताना आयुष्य कसं, आनंदाने भरलेलं असतं
मोठे होईपर्यंत त्याचं गमक, आपल्याला मुळी कळत नसतं
हळू हळू शाळा संपते, कॉलेज ची वाट मोकळी होते
जमिनीवर चालता चालता, जिंदगी आपल्याला हवेत नेते
हळूच डोकावणाय्रा अक्कलदाढेचं, कौतुक आमचं संपत नसतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?

कॉलेज संपतं, आम्ही नोकरी शोधतो
त्यानंतर छोकरी पाहून, एका नव्या बंधनात अडकतो
आईच्या हाती बनलेलं जेवण, दोन वेळा आम्हाला हवं असतं
रात्री बायकोच्या कुशीत शिरून, गाढ झोपून जायचं असतं
आपल्या माणसांच्या सहवासात, सगळं आयुष्य घालवायचं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?

दिवसांवर दिवसांच्या राशी, प्रश्न नवे दर दिवशी
जगात काय चाल्लंय? माझा काय घेणं त्याच्याशी?
दुनियेच्या राजकारणात आम्हाला, अजिबात पडायचं नसतं
सामाजिक प्रश्न; आणीबाणी, याशी आमचं काही नातं नसतं
आम्ही आमच्या लहान विश्वात, आमचं सुख शोधलेलं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?

असच आयुष्य पुढे सरकतं, मुलाबाळांनी घर फुलतं
नव्या जबाबदाय्रांमध्ये आम्ही, पुरते अडकून बसतो
त्याचं बालपण त्याचं शिक्षण, ह्यातच आम्ही हरवून जातो
दर वर्षी सुट्टीत एकदा, महाबळेश्वर ला फिरून येतो
त्या क्षणांच्या आठवणींवर आमचं, पूर्ण वर्ष सुखात जातं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?

हळू हळू जगता जगता, आमचं वय दिसू लागतं
सगळं आयुष्य मग, मुलांच्या खांद्यावर विसावतं
"सांभाळून घेतील आपल्याला", असा कायम समज असतो.
आणि आयुष्याच्या ह्या लढाईत मात्र, आम्ही बहुतेक हरलेले असतो
थोडासा आधार आणि नातवंडांचं, भरघोस प्रेम हवं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?

आयुष्याचा अंत जवळ येतो, आपण जुन्या आठवणी शोधू लागतो
काही मागे राहायला नको, सगळे क्षण आठवत राहतो
तीच तर शिदोरी असते, जाताना मनात साठवून न्यायची
बहुतेक पूर्तता झालेली असते, आमच्या बय्राच इच्छांची
समाधानाचे अनंत श्वास, आपण अशा वेळी उपभोगत असतो
आणि आमच्यासारख्यांना मरण्यासाठीही आणखी कुठे काय हवं असतं?????

आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.....

आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो
हाक आल्या क्षणाला, वेड्यासारखे धावलो
लोकांनी आपले सगळी, कामं साधून घेतली
आणि आपल्या वेळेला मात्र, सहज पाठ फिरवली
झगडत राहिलो, लढत राहिलो, त्यांच्यासाठी करत राहिलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो...

तूच रे तूच, कायम आपला दोस्त
तुझ्यासोबत मित्रा आपण, दंग आयुष्यात मस्त
शब्दांमधून प्रेम आणि, पाठीवर एक थाप फक्त
प्रसंग आला की सगळ्यांचं प्रेम, वाऱ्यासोबत उडून जातं
आपण त्यांच्या साथीसाठी, वाट कायम पाहत राहतो
मनामध्ये कल्पनांचे, अनेक मनोरे बांधत राहतो
एका क्षणाला वाटतं मग, आपण खरंच फसलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो...

असल्याक्षणी आपल्या वाट्याला , फक्त मनस्ताप येतो
विचारांचा अवास्तव गोंधळ, मनामध्ये माजतो
आपले मित्र म्हणता म्हणता, सगळेच काम साधतात
वेळ सरली की सहज, आपल्याला बाजूला सारतात
मग वाटत राहतं "आपण का नाही असे कधी वागलो?"
हिशोबांच्या या दुनियेत, इतके बेहिशोबी ठरलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो....

मित्र मित्र म्हणणारे, सिगारेटच्या धुरासोबत उडून जातात
ओंजळीतल्या वाळूसारखे, नकळत निसटून जातात
मग विचार येतो मनात, आपण नक्की काय केलं
भरल्या आपल्या ओंजळीत, काहीच कसं नाही राहिलं
सुखाच्या सगळ्या क्षणांत फक्त, आठवण बनून साठलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो...

मग थोडासा प्रयत्न होतो, इतरांसारखं वागायचा
लोकांच्या सवयीप्रमाणे, आपलं आयुष्य जगायचं
खरं काय खोटं काय, कळेनासं होतं मग
नसलेल्या गोष्टी करता करता, आपणच हरवतो
नाद सोडायचा ह्या सगळ्याचा, निदान स्वतःच्या नजरेत तरी नाही उतरलो
पण आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.....
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.....